महाराष्ट्रसातारासामाजिक

महाराष्ट्र शासन कृषी विभागा मार्फत मामुर्डी येथे शेतकरी संवाद दिन साजरा

स्टार ११ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क – बजरंग चौधरी

मेढा दि.२९  मौजे मामुर्डी ता जावली येथे महाराष्ट्र शासन कृषी विभाग मार्फत कृषी संजीवनी मोहीमे अंतर्गत प्रगतशील शेतकरी संवाद दिन साजरा करण्यात आला.

सदरच्या कार्यक्रमात कृषी सहाय्यक विलास कदम यांनी कृषी विभागाच्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची माहिती दिली,तसेच यांत्रिकीकरण या योजनेविषयी सखोल मार्गदर्शन केले. प्रगतशील शेतकरी श्री पांडुरंग धनावडे यांनीही त्यांचे थोडक्यात मनोगत व्यक्त केले.

कृषी सहायक श्री श्याम मेंडके यांनी शेतकरी अपघात विमा योजना व विस्तार विषयक योजेनेची सविस्तर माहिती दिली. सदरच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरपंच श्री जगन्नाथ धनावडे यांनी केले . ग्रामपंचायत सदस्य बाजीराव धनावडे यांनी आभार मानले. कार्यक्रमास पत्रकार श्री बजरंग चौधरी व शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Team Star11Maharashtra

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!