महाराष्ट्रशैक्षणिक

चित्रकार मोहन जगताप यांनी टिपलेल्या प्रेरणादायी छायाचित्राची केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून दखल व प्रशंसा

स्टार ११ महाराष्ट्र न्युज प्रतिनिधी ——

सातारा.दि.१४.जागतिक साक्षरता दिनी पहिलंवहिलं पाऊल शाळेच्या आवारात टाकणार्‍या व अक्षरे गिरविनार्‍या 76 वर्षीय बबई रामचंद्र मस्कर यांच्या शाळेच्या आवारात शिक्षणासाठी गेलेल्या प्रसंगाची मोहन जगताप यांनी छायाचित्र टिपले व त्याची केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने दखल घेतली आहे.

केंद्रीय शिक्षण सचिव संजयकुमार अवर्णनीय व प्रेरणादायी अशा शब्दात प्रशंसा केली आहे. तर केंद्रीय मंत्रालयाने त्यांचा फोटो ” अद्वितीय आनंद का अनुभव ” असे शिर्षक देवून तपशिलासह ट्विट केला आहे.

देशभरात मागील वर्षापासुन नवभारत साक्षरता अभियान ” सर्वासाठी शिक्षण ” या नावाने सुरू झाले आहे महाराष्ट्रात त्याची सुरुवात 8 सप्टेंबर रोजी जागतिक साक्षरता दिनी करण्यात आली 15 वर्ष व त्याहून अधिक वयाच्या निरक्षरांच्या साक्षरतेसाठी सन 2027 पर्यन्त कालबद्ध कार्यक्रम केंद्र शासनाने राज्याच्या मदतीने राबवणे सुरू केले आहे.

राज्यातील उपक्रमाच्या प्रारंभीची छायाचित्र व तपशील योजना संचालनालयाने केंद्र सरकारकडे सादर केले होते. सामाजिक कार्यकर्ते व नामवंत चित्रकार मोहन जगताप सातारा यांनी या महिलेचे साक्षरता वर्गातील पाहिल्या दिवसाचे छायाचित्र शिक्षण संचालक महेश पालकर व योजना उपसंचालक राजेश क्षीरसागर यांना पाठविले क्षीरसागर यांनी राज्य व केंद्रीय मंत्रालयास पाठविले होते. सातारा जिल्ह्य़ातील 76 वर्षीय बबई रामचंद्र मस्कर या साक्षरता वर्गात सहभागी होवून त्यांनी पहिल्या दिवशी काही अक्षरे व अंक पाटीवर गिरविले आपणास लिहता आल्याचा त्यांच्या चेहर्‍यावरील आनंदाचे दिसणारे भाव मोहन जगताप यांनी आपल्या कॅमेर्‍यात कैद केले होते.

चिंचणी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत अभियानाच्या पाहिल्याच दिवशी नवभारत साक्षरता अभियानात सहभागी झाल्या त्यांना असाक्षरतेतून साक्षरतेचे धडे देण्यासाठी माजी उपसभापती नामदेवराव सावंत यांचे मार्गदर्शनाखाली सरपंच जितेंद्र सावंत ग्रामस्थ व मुख्याध्यापक कमल गायकवाड. माधवी ढवळे .,स्वाती लकडे सावंत व यासह समाजसेवी बांधव स्वयंसेवक सहकार्य करीत आहेत.

राज्यातील प्रतिभासंपन्न चित्रकार व जेष्ठ पत्रकार मोहन जगताप यांनी त्यांची भावमुद्रा कॅमेऱ्यात टिपली आहे राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचे अवर सचिव प्रदीप हेडाऊ यांनीही या प्रेरणादायी प्रसंगाची व छायाचित्राची प्रशंसा केली.

.============================== राज्यात 1 कोटी 63 लाख निरक्षर केंद्र शासनाने शाळा हे एकक ठरवून स्वयंसेवकांच्या मदतीने प्रौढ निरीक्षकांना साक्षर करण्यासाठी नवभारत साक्षरता कार्यक्रम सुरू केला आहे. महाराष्ट्रात सन 2011 च्या जनगणनेनुसार 1 कोटी 63 लाख निरक्षर आहेत. चालू वर्षी राज्याला मागील वर्षीच्या उद्दिष्टासह 12 लाख 40 हजार निरक्षरांना साक्षर करण्याचे उद्दिष्ट मिळाले आहे. त्यांच्या सविस्तर सुचना योजना शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी दिल्या आहेत. त्यानुसार राज्यभर गावोगावी साक्षरतेचे वर्ग कमी अधिक संख्येने सुरू झाले आहेत.

=========/==================

गरिबीमुळे शिक्षणा पासून वंचित बबई रामचंद्र मस्कर यांचा जन्म 1945 साली झाला. गरिबीमुळे शिक्षणासाठी दारिद्र्य असल्याने शिक्षण घेता आले नाही. सातारा जिल्ह्य़ातील सातारा शहारा पासून जवळच असलेल्या चिंचणी हे गाव कण्हेर धरण प्रकल्पाच्या माध्यमातून चार ठिकाणी विस्थापित झाले पण मूळ गावच्या दक्षिण बाजूस वसलेल्या या पुनर्वसित गावातील घराघरातून शिपाई ते तहसीलदार व पोलीस दलात आर्मी लेखा परीक्षण विभाग अशा व अन्य ठिकाणी उच्च पदावर येथील युवक दिसून येतात. गावातील राजकिय सामाजिक सांस्कृतिक व व्यापार क्रीडा क्षेत्रात लोक कार्यरत असून तरुणांच्या या मोठेपणाने भारावलेल्या बबई आज्जी या शिक्षण घेण्यासाठी आतुर आहेत =============================

डोळ्याला सुंदर दिसणार्‍या दृष्टीने विविधता प्राप्त होणारी अनेक छायाचित्रे राज्यातील विविध वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली असून चित्रकाराने काढलेलं छायाचित्रे लोकांना भावते कोणत्याही प्रसंगातील विविधतेचे एक अविस्मरणीय अनुभव मुद्रित करण्यासाठीचे क्षण टिपून ते कॅमेर्‍या बंद करण्यापेक्षा हातानी ते क्षण चित्रित करण्याची मजा फोटोतल्या भावमुद्रा आनंद देतात…….मोहन जगताप ==============================

Team Star11Maharashtra

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!