स्टार ११ महाराष्ट्र न्यूज ——–
कुडाळ.दि.२७.कुडाळमार्गे पाचगणी व मेढ्याकडे जाण्यासाठी छत्रपती संभाजी महाराज चौक महत्वाचा असून सध्या या चौकात वाहनांची वर्दळ वाढू लागली आहे.दर शनिवार,रविवारी पर्यटनासाठी पाचगणी महाबळेश्वर तसेच कास बामणोलीला जाणाऱ्या गाड्या या मार्गावरून जात आहेत. पर्यटकांच्या वाहतुकीने वाहनांची गर्दी वाढू लागली आहे.त्यामुळे कुडाळ येथील छत्रपती संभाजी महाराज चौकात मात्र वाहतुकीची कोंडी होत आहे.
तसेच छोट्या-मोठ्या अपघातास निमंत्रण मिळत असल्याने चौकात गतिरोधक असणे आवश्यक आहे.स्थानिक नागरिक, वाहनचालकांकडून याठिकणी गतिरोधक बसविण्याची तीव्र मागणी होऊ लागली आहे.या चौकामध्ये वाहनांना ये-जा करण्यासाठी अनेक अडीअडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच याठिकणी मोठ्या प्रमाणत बॅनरबाजी होत असल्याने वाहतुकीला याचा अडथळा निर्माण होत आहे.एकाच वेळी दोन वाहने याठिकानातून सहजासहजी पास होत नाहीत.
तसेच याच चौकामध्ये मोठी विद्युत डीपी असून जर एखाद्या वाहनधारकाकडून वाहनावरचा ताबा सुटला तर वाहन हे या विद्युत डीपीवर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे वाहनधारकांना वाहन चालवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे छत्रपती संभाजी महाराज चौकामध्ये व गणेश चौक येथे लवकरात लवकर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून गतिरोधक बसवण्याची मागणी वाहनधारक व शेतकरी वर्गातून होऊ लागली आहे.याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाणे त्वरित लक्ष घालून वाहनचालकांची होणारी गैरसोय दूर करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.
छत्रपती संभाजी महाराज चौकातील उभारण्यात आलेले सर्कल याची असणारी जागा थोडीशी कमी करण्यात यावी.तसेच चौकामधील विद्युत डीपी भविष्यामध्ये तेथून हलवली गेली तर निश्चितच चौकामधील ये-जा करण्यासाठी मोठी जागा निर्माण होऊ शकते.
माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य -विरेंद्र शिंदे