
मेढा / प्रतिनिधी
मेढा.दि.१७. माझा पराभव तांत्रिक झाला आहे. माझ्या विरोधात प्रचार करण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदि यांना सातारा जिल्हयात यावे लागले त्यांच्यासह राज्याचे मुख्यमंत्री , दोन उपमुख्यमंत्री , अनेक मंत्री , जिल्ह्यातील त्यांच्या विचाराचे आमदार , खासदार यांना अनेक सभा घ्याव्या लागल्या . मात्र जनतेने हि निवडणूक हातात घेतल्याने व पहिल्या फळीचे नेते आपल्या बरोबर नसले तरी ५ लाख ३६ हजार मताधिक्य देण्याचा प्रयत्न झाला हे थोडे थोडके नाही . विजय आपलाच होता. पण जिल्हयात शशिकांत शिंदेचे महत्व वाढेल म्हणून काहींनी भितीपोटी सहकार्य केले नाही. त्यामुळेच समोर विजय असताना पराभवाला सामोरे जावे लागले. अपयशाने खचून जाणारा मी नाही. शशिकांत शिंदे काय आहे हे आता जिल्हयातील नेत्यांना दाखवून देणार आहे. पक्ष संघटना व पवार साहेबांचे विचार तळागाळा पर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सुचित करून निवडणूकीत मताधिक्य देण्याचा प्रयत्न करणाऱ्या सर्वांचे आ. शशिकांतजी शिंदे यांनी धन्यवाद मानले.

केडंबे ता. जावली येथील सभामंडपाचे लोकार्पन सोहळ्या प्रसंगी आ. शशिकांतजी शिंदे बोलते होते. आ. शिंदे पुढे .बोलताना म्हणाले , या सरकारकडे जनतेच्या विकासाचा निर्णय नाही. जातीय वाद , बेकारी, बेरोजगारी वाढविण्याचे काम सत्ताधाऱ्यांनी केले .ओरीसा , आंध्र प्रदेश , दिल्ली , मध्य प्रदेश या ठिकाणी भाजपला सहकार्य झाले नसते तर त्याचे सरकार आले नसते. दुसऱ्यांच्या कुबडया घेवून स्थापनं झालेले सरकार जास्त दिवस चालणार नाही. मी पराभवाला घाबरत नाही . विजयी झालो असतो तर खासदार . काय असतो हे राज्याला दाखवून दिले असते . येणाऱ्या विधानसभेच्या निवडणूकीत सत्ता महाविकास आघाडीचीच येणार असून जावलीचा आमदार हा महाविकास आघाडीचाच होईल असा विश्वास आ . शिंदे यांनी व्यक्त केला.
या प्रसंगी आदिनाथ ओंबळे यांनी शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा करण्याबरोबरच प्रलंबीत असणारे बोंडारवाडी धरणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करावा अशी विनंती केली. तर बाळासाहेब ओंबळे व महादेव ओंबळे यांनी सभामंडपाचे उर्वरित कामाबरोबरच इतर कामांना निधी उपलब्ध करण्याबाबत विनंती केली.
प्रारंभी आ . शशिकांतजी शिंदे यांचे शुभहस्ते फित कापून सभामंडपाचे उद्धाटन करण्यात आले. या प्रसंगी युवा उद्योजक राजेंद्र धनावडे, प्रतापगड चे संचालक आनंदराव जुनघरे, श्रमिकचे संस्थापक आदिनाथ ओंबळे, शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख विश्वनाथ धनावडे, राष्ट्रवादीचे विधानसभा अध्यक्ष सुरेश पार्टे, महिला अध्यक्षा सौ. रूपाली भिसे, जावली बँकेचे संचालक चंद्रकांत गवळी, युवक अध्यक्ष अतिश कदम, समिर डांगे, रोहीत रोकडे, प्रमोद पवार, सुनिल फरांदे, संतोष बैलकर, संदीप पवार , संपत मोरे, राम कदम , मोहन देशमुख, कोंडीबा ओंबळे, चंद्रकांत ओंबळे, राजाराम ओंबळे, शांताराम ओंबळे , संपत मोरे ,यांच्यासह मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.उपस्थीताचे स्वागत बाळासाहेब ओंबळे यांनी केले तर आभार बळवंत पाडळे यांनी मानले.