सातारासामाजिक

दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा

हिंदू संस्कृतीत घराच्या अंगणातील तुळसी वृंदावनासमोर रोज सायंकाळी दिवा लावताना ‘शुभं करोती’ हा श्लोक ऐकायला मिळतो. दीपोत्सवात नरक चतुर्दशीला दीपदान केल्यास नरकवास भोगावा लागत नाही, अशी समजूत आहे. पण आजही ‘दीपज्योतीला अर्थात, घरी येणाऱ्या प्रकाशमय लक्ष्मीला नमस्कार केला जातो साधूसंतांचे आगमन ज्या दिवशी घरी होईल, तो दिवस दिवाळीसारखाच असल्याचे अनेकांनी स्पष्ट केले आहे.

दिव्यांचे महत्त्व पुराणकाळापासून आहे. सूर्य आणि अग्नीचे प्रतीक असलेला दिवा हिंदू संस्कृतीत पवित्र मानला आहे दीपावलीत दिवा हा पणती, समई, नंदादीप, दीपमाळ लामणदिवा, आकाशदिवा यांच्या रूपातील प्रकाशमय पर्वात अंधार अर्थात, मनातील विकारी विचारांचा नाश करून सकारात्मक विचारांकडे जाण्याचे दिशादर्शन करतो. अर्थात, भारतीय हिंदू संस्कृती ही तेजाची प्रकाशाची पूजा करणारी आहे. तिमिरातून तेजाकडे असा हा दीपोत्सवाचा प्रवास आहे.

दिवाळी किंवा दीपावली हा एक प्रमुख हिंदू सण आहे हा दीपोत्सव भारतात सर्वत्र साजरा होतो. या सणाला घरात व घराबाहेर तेलाचे लहान दिवे लावले जातात, उंच जागी आकाशदिवा (आकाशकंदिल) लावला जातो. घराबाहेर रांगोळी काढून अंगण सुशोभित केले जाते पावसाळा संपून नवीन पिके हाती आल्यानंतर शरद ऋतूच्या ऐन मध्यभागी, आश्विन व कार्तिक या महिन्यांच्या संधिकालात हा सण येतो. आश्विन वद्य द्वादशी ते कार्तिक शुद्ध द्वितीया हे सहा दिवस या सणाचे असतात! पावसाळा संपून नवीन पिके हाती आल्यानंतर शरद ऋतूच्या ऐन मध्यभागी, आश्विन व कार्तिक या हा सण येतो उपलब्ध पुराव्यांनुसार, दिवाळी हा सण किमान तीन हजार वर्षे जुना आहे . लक्ष्मी पूजनाच्या प्राचीन काळातील उपलब्ध असलेल्या संदर्भानुसार अगोदर रात्री कुबेरपूजन करण्याची रीत होती… लक्ष्मीपूजन आणि खाणे-पिणे मित्र-मैत्रिणींच्या आप्तांच्या भेटी घेणे, एकमेकांच्या घरी फराळाला जाणे, त्यांना आपल्या घरी बोलावणे, रात्री फटाक्यांची आतषबाजी करणे, ही आताची दिवाळी .

ती रमा एकादशीपासून (आश्विन कृष्ण एकादशीपासून) सुरू होते.. त्या रात्री फक्त तुळशीपुढे तेल-वात घालून उजळवलेली पणती ठेवतात दुसरा दिवस वसू बारस या दिवसापासून रोज भरपूर पणत्या लावून विजेच्या दिव्यांची रोषणाई करतात. तिसरा दिवस हा धनत्रयोदशीचा ज्या बायकांनी आधीपासूनच दिवाळीचा फराळ, म्हणजे लाडू, करंज्या, शंकरपाळी, कडबोळी, शेव- चकली – चिवडा करायला सुरुवात केली नसेल तर, ती करून कामे लवकरात लवकर संपवतात. तिन्हीसांजेला पणत्या लावून सारे घर उजळवून टाकतात. चौथा दिवस म्हणजे, नरक चतुर्दशी पहाटे उठून घराबाहेर पणत्या ठेवतात आणि रोषणाई करतात. घरातील लोकांचे, विशेषतः पुरुषांचे, सूर्योदयापूर्वीच तेल, उटणे लावून अभ्यंगस्नान होते लोक आंघोळ करून झाल्यावर फुलबाज्या लावतात आणि फटाके फोडतात नंतर प्रत्येकाची आरती करून दिवाळीचा फराळ खातात. शेजारपाजाऱ्यांना फराळाची ताटे पाठवतात. त्यांच्याकडूनही ताटे येतात ज्यांच्या घरात काही अशुभ घडल्याने दिवाळी नसते, त्यांना आवर्जून फराळाचे जिन्नस आणि मुलांसाठी फटाके पाठवतात. पुढचा दिवस हा लक्ष्मीपूजनाचा असतो. या दिवशी संध्याकाळी लक्ष्मीची साग्रसंगीत पूजा होते ही पूजा घरातला कर्ता पुरुष करतो. लक्ष्मीच्या मूर्तीशेजारी, काही दागिने आणि बंदे रुपये ठेवतात… त्यांचीही पूजा होते प्रसादासाठी भेंड, लाह्या, बत्तासे एकत्र करून एका तबकात ठेवलेले असतात. घरात या दिवसासाठी मुद्दाम केलेले अनारसेही ठेवतात. पूजेनंतर प्रसाद वाटतात व खातात.

गोव्यातील दिवाळी सामुदायिक आतिथ्याची असते. शेजारी पाजारी एकत्र जमून प्रत्येकाकडे जातात आणि दूधगुळाच्या पोह्यांचा फराळ करतात. गोव्यातील तसेच महाराष्ट्रातील पश्चिम किनाऱ्यावरील विविध गावांमध्ये आणि शहरी भागात नरकासुर राक्षसाचे पुतळे तयार करून त्यांचे दहन करण्याची स्पर्धा दरवर्षी आयोजित केली जाते हे दिवाळीचे आकर्षण मानले जाते.

दक्षिण भारतात या दिवशी सूर्योदयापूर्वी केलेले स्नान गंगास्नानाइतके पवित्र मानले जाते तमिळनाडूमध्येही काही लोक नरकचतुर्दशीला सूर्योदयापूर्वी दोनदा स्नान करतात. आंध्र प्रदेशातील लोक घरासमोर एक मचाण बांधून त्यावर पणत्या लावतात व स्त्रिया त्याच्यावर बसून रात्रभर लक्ष्मीच्या स्वागताची गाणी गातात लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रेड्यांच्या टकरी लावतात आश्विनी अमावास्येला केलेले पितृतर्पण विशेष फलप्रद मानतात अश्विन महिन्यातील अमावास्येला लक्ष्मीपूजन झाल्यानंतर कार्तिक शुद्ध प्रतिपदेला बलिप्रतिपदा हा दिवस दिवाळी पाडवा म्हणून साजरा केला जातो. सोने खरेदीस प्राधान्य, सुवासिनींकडून पतीला औक्षण, व्यापाऱ्यांसाठी वर्षाचा प्रारंभ अशा अनेक बाजूंनी या दिवसाचे महत्त्व अधोरेखित केले जाते. पाडव्याला पंचरंगी रांगोळीने बळीची प्रतिमा काढून तिचे पूजन करतात इडा पीडा टळो आणि बळीचे राज्य येवो, अशी प्रार्थना या दिवशी केली जाते. फटाक्यांची आतषबाजी, तसेच दीपोत्सवही केला जातो. या दिवसाचे वैशिष्ट्य म्हणजे साडेतीन मुहूर्तापैकी एक असा हा दिवस अतिशय शुभ मानला जातो.

बहीण भावाच्या प्रेमाचे प्रतीक असलेला दिवस म्हणजे भाऊबीज भाऊबीज अथवा यमद्वितीयला बहिण भावाला औक्षण करते . आणि भाऊ बहिणीला भेटवस्तू देतो आणि दिवाळी सणाची सांगता होते .

Team Star11Maharashtra

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!