महाराष्ट्रसामाजिक

रमाई आवास योजनेमुळे कच्च्या घरातून पक्क्या घरात

शासन आपल्या दारी” उपक्रमांतर्गत 150 घरकुलांना मंजुरी

स्टार ११ महाराष्ट्र न्युज प्रतिनिधी ——

सातारा.दि.०८. देशातील प्रत्येक नागरिकास स्वत:चे पक्के आणि हक्काचे घरकुल देणे यासाठी केंद्र व राज्य शासन कटीबद्ध आहे. त्या दृष्टीने टप्याटप्यान ने घरे उपलब्ध करुन देण्यासाठी शासनाच्या अनेक घरकुलांच्या योजना गतीमान करण्यात आल्या आहेत. या योजनेच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यातील अनेक गरीब कुटुंबांना उत्तम दर्जाची घरे मिळाली आहेत. सातारा जिल्हा आवास योजना राबविण्यात राज्यातच नव्हे तर देशपातळीवर आघाडीवर राहिला आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त गरीब व गरजू कुटुंबांना पक्की व चांगली घरे देण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न असून त्यानुसार जिल्हा प्रशासन प्रभावी अंमलबजाणी करीत आहे. “शासन आपल्या दारी” उपक्रमांतर्गत 150 घरकुलांना मंजुरी देवून अनुसूचित जातीतील घटकांना दिलासा देण्याचे काम शासन करीत आहे.


अनुसूचित जातीच्या व्यक्तींना अनेकदा बिकट आर्थिक परिस्थितीमुळे स्वत:च्या उत्पन्नातून उत्तम दर्जाचे पक्के घर बांधणे शक्य होत नाही. ग्रामीण व शहरी भागातील अनुसूचित जातीच्या लोकांचे राहणीमान उंचावावे व त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न सुटावा म्हणून लाभार्थ्याना त्यांच्या स्वत:च्या जागेवर अथवा कच्यार् घराच्या ठिकाणी पक्के घर देणे हा या योजनेचा उद्देश आहे.


रमाई आवास घरकुल (ग्रामीण) योजनेंतर्गत घरकुलासाठी प्रति लाभार्थी 1 लाख 20 हजार रुपये सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, समाज कल्याण कार्यालयाकडून देण्यात येतात. सन 2023-24 या वर्षामध्ये सातारा जिल्ह्यासाठी रमाई आवास घरकुल (ग्रामीण) योजने करिता एकूण 875 घरकुलांचे उद्दिष्ट प्राप्त आहे. त्यानुसार शासन आपल्या दारी उपक्रमांतर्गत पाटण तालुक्यातील 150 घरकुलांना मंजुरी देण्यात आलेली आहे.
घर हे प्रत्येकाचे स्वप्न असते. पण अनेकदा आणि अनेकांसाठी ते आर्थिक कुवतिच्या अवाक्याबाहेर जाते. अशांच्या जीवनात, कुटुंबात या योजनेमुळे स्वप्नपुर्तीचा आनंद निर्माण झाला आहे.

रमाई आवास योजनेतून शासनाने आम्हाला पक्का निवारा उपलब्ध करुन देत असल्यामुळे आमच्या लेकराबाळांच्या जीवनाला सुरक्षितता लाभणार आहे. स्वत:च्या पक्यााज घराचा आनंद आमच्यासाठी खरोखरच स्वप्नवत आहे. आता आमचे राहणीमान उंचविण्यास खूप मदत होणार आहे. याबद्दल आम्ही राज्य शासनाचे खूप खूप आभारी आहोत अशा शब्दात दिवशी ता. पाटण येथील सुभाष बाबुराव महापुरे व जानुगडेवाडी ता. पाटण येथील चंद्रकांत बाळू थोरात यांनी भावना व्यक्त केल्या.


राहूल पवार
जिल्हा माहिती कार्यालय, सातारा
00000

Team Star11Maharashtra

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!