स्टार ११ महाराष्ट्र न्यूज ——-
बामणोली.दि.११. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या पदाधिकारी निवडी जाहीर झाल्या असून जिल्हा कार्याध्यक्ष अमित दादा कदम आणि सरचिटणीस निवास शिंदे यांच्या हस्ते सातारा-जावळी विधानसभा मतदारसंघाच्या अध्यक्षपदी अमितदादांचे कट्टर समर्थक व दोन्ही तालुक्यामध्ये तळागाळात दांडगा जनसंपर्क असणारे सामाजिक कार्यकर्ते, अंधारीचे सुपुत्र, ग्रुप ग्रामपंचायत अंधारी-कास चे उपसरपंच रवींद्र पांडुरंग शेलार यांची निवड करण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या मान्यतेनुसार विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर, आमदार मकरंद पाटील, यांच्या मार्गदर्शनाखाली या निवडी करण्यात आल्या. तर जिल्हाध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर आणि कार्याध्यक्ष अमित कदम यांच्या अध्यक्षतेखाली निवडी पार पडल्या.सातारा-जावळी विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी निवडी जाहीर करून पक्ष मजबूत करण्याचा प्रयत्न झाला आहे.
रविंद्र शेलार हे गेल्या ३० वर्षापासून राजकीय तसेच सामाजिक कार्यात सक्रिय आहेत. शेलार हे गेल्या २५ ते ३० वर्षापासून मा.आ.कै.जी जी कदम यांच्या घराण्याशी एकनिष्ठ असल्याचे आहेत .त्यांची यापूर्वी सातारा-जावळी विधानसभा मतदारसंघाच्या कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली होती.
तत्कालीन अध्यक्ष शशिकांत वाईकर यांची सातारा तालुकाध्यक्षपदी वर्णी लागल्यामुळे सातारा-जावळी विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष पद रिक्त झाले होते. त्यामुळे जिल्हा कार्याध्यक्ष अमित दादा कदम यांनी त्यांचे अत्यंत निकटचे सहकारी रवींद्र शेलार यांची पुढील राजकीय घडामोडी विचारात घेत आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवड केली.त्यांच्या समवेत मतदार संघाच्या कार्याध्यक्षपदी महेश पाटील तर जावळी तालुकाध्यक्षपदी मेढा दक्षिण विभागाचे नेते अमितदादांचे कट्टर समर्थक साधू चिकने यांची निवड करण्यात आली आहे.
कार्यकर्तृत्व आणि संघटनात्मक कौशल्य यात शेलार यांचा हातखंडा असल्यामुळे त्यांच्यावरती ही जबाबदारी दिली असून सातारा-जावळी विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांमध्ये यामुळे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
माझ्यासारख्या संघर्षातून पुढे आलेल्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सातारा-जावळी विधानसभा मतदार संघाचे पक्ष संघटन व विस्ताराची जबाबदारी देऊन आमचे वरिष्ठ नेते अमित दादा कदम यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे; त्यास पात्र राहून मतदारसंघातील सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी यांना बरोबर घेऊन येत्या सर्व निवडणुकांमध्ये मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित दादा गट) नंबर एकचा पक्ष म्हणून कसा उभा राहील, यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे.
श्री रविंद्र शेलार,सातारा-जावळी विधानसभा अध्यक्ष.