निधन वार्तासातारा

रामवाडीचे आप्पा नावाची एल आय सी अनंतात विलीन

करहर विभागातील विमा पॉलिसी धारकांवर दुःखाचा डोंगर कोसळला

स्टार ११ महाराष्ट्र न्युज —— शब्दांकन : दिलीप पाडळे ( रामवाडी )

पाचगणी. दि.०६.   ” आप्पा ” म्हणजेच एल् आय सी हे जणू समीकरणच होत. १९६५ साली त्यांनी हजारो लोकांना बचतीची सवय लावली. त्याकाळी मार्केटिंग करणे सोप नव्हतं. मात्र आप्पांनी घरोघरी जाऊन लोकांना भेटून विमा पॉलिसी काढल्या आणि लोकांचे संसार सुखी केले. अनेक कुटुंबांचे आधारवड बनलेल्या आत्माराम कोंडीबा पाडळे उर्फ (आप्पा ) यांचे नुकतेच मंगळवार दिनांक ५ डिसेंबर २०२३ रोजी आकस्मित निधन झाले. आणि आम्ही एका ज्येष्ठ मार्गदर्शक, सल्लागार, व्यावसायिकास मुकलो आज आप्पा आमच्यात नाहीत हे मानायला मन तयारच नाही. अशा हसतमुख चेहऱ्याच्या आप्पा यांना भावपूर्ण आदरांजली.

आप्पा यांचा जीवन परिपाठ थोडक्यात

आत्माराम कोंडीबा पाडळे ( आप्पा ) यांचे शिक्षण जुन्या अकरावी पर्यंतचे वाई येथे झाले होते. त्यावेळी दळणवळण व्यवस्था नसल्याने वाहने नव्हती. त्यामुळे वाई येथे राहवे लागे, शनिवार रविवार या दिवशी सुट्टीच्या निमित्ताने बावधन मार्गे एक डोंगर चडून दुसरा डोंगर उतरून गावदर्शनास रामवाडी येथे येऊन पुन्हा सोमवारी सकाळी आल्या पाऊल वाटे परतीचा प्रवास धरत पुन्हा वाईला जायचे असा नित्यक्रम करून त्यांनी आपले जुने मॅट्रिकचे शिक्षण पूर्ण केलंत्यानंतर काही काळ त्यांनी हुमगाव येथे शिक्षक म्हणून नोकरी केली ते करीत असतानाच घरी जोड व्यवसाय म्हणून छोटे किराणा दुकान चालू केले. हुमगाव – रामवाडी त्यांचा प्रवास सायकल द्वारे असे ही दुहेरी कसरत चालू असतानाच त्यांना एल आय सी मध्ये विमा प्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी मिळाली.

त्यांनी १९६५ साली एल आय सी विमा प्रतिनिधी म्हणून जावळी तालुक्यात काम सुरू केलं. त्यावेळी आजच्या सारखे मार्केटिंग नव्हते. त्यामुळे लोकांना बचतीचे महत्त्व पटऊन देणं मोठ कौशल्याचे काम होत. आजारपणाच्या कारणास्तव शिक्षकी पेशाला रामराम करावा लागला. मात्र शिक्षकी पेशातील वक्तृत्व हे कौशल्य गुण अंगी होता. तीच वक्तृतत्वाची शिदोरी पुढे त्यांच्या कामी आली.

त्या माध्यमातून जावळी, वाई, महाबळेश्वर तालुक्यात सायकल वर गावोगावी जाऊन लोकांना बचतीची सवय लावली. आणि अनेक कटुंबांना विमा पॉलिसी करण्यास लोकांना प्रवृत्त केलं. त्यामुळे अनेकांच्या संसाराला यामुळे मोठा हातभार लागला. तर पॉलिसी धारकावर कोणती आपत्ती कोसळली तर आप्पा स्वतः पुढे होत एल आय सी माध्यमातून सदैव तत्पर सेवा देत असत. स्वतः सातारा येथे जाऊन पॉलिसी मधून रक्कम मिळवून देण्याकरिता जीवाची बाजी लावून प्रयत्न करीत होते. त्यांनी अनेक पॉलिसी धारकांना विम्याचे संरक्षण कवच मिळवून दिले . त्यामुळे आप्पांची नाळ आपल्या ग्राहकांशी आधिक जोडली गेली होती.

त्यानंतर आप्पांनी राजदूत कंपनीची मोटरसायकल घेतली होती. आता ते आपल्या राजदूत वरून प्रवास करीत होते. मात्र एक दिवस सातारा येथील एल आय सी कार्यालयाचे विमा पॉलिसीचे काम करून येत असताना सन १९८८ – ८९ मध्ये आप्पाचां पाचवड फाटा येथे जीवघेणा अपघात झाला होता. त्यातून बरे झाल्यावर आप्पांनी आपले एल आय सीचे काम अविरतपणे पुढे अधिक जोमाने चालू केले. दुकानात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तींना आप्पा एल आय सी चे महत्व पटवून देत असत. एकदा नव युवक कामाला लागला तर आप्पा त्यास नक्कीच भविष्याची तरतूद म्हणून त्यास विमा पॉलिसी घेण्यास सांगत होते. यातून त्याची दूरदृष्टी अधोरेखित होते.

एल आय सी मध्ये विमा प्रतिनिधी म्हणून काम करीत असताना आप्पांनी अनेकदा आपल्या कामाच्या जोरावर प्रमोशन मिळवली आहेत. उत्कृष्ठ विमा प्रतिनिधी म्हणून त्यांचा प्रत्येक बऱ्याच वेळा पुरस्कार रुपी गौरव झाला आहे. पुढे त्यांनी आपल्याच घरामध्ये मुलांना आणि सुनांना सुद्धा विमा प्रतिनिधी बनविले आहे. त्यांचा तोच वारसा त्यांचे कुटुंबीय पुढे नेहत आहेत.

त्यांचा हसतमुख चेहरा व बोलण्यातील लकब विंनभ्र विनयशीलता हेच गुण आप्पांना मोठे करून जातात. ते मास्तर म्हणून परिचित होते. यामुळेच आज त्यांचे चाहते तालुक्याबरोबरच जिल्ह्यात अनेक ठिकाणी आहेत. ते जिल्हात सर्वत्र प्रख्यात आहेत. तर ते व्यावसायिक ते उत्तम मार्गदर्शक आणि सल्लागार होते.

आज त्यांची प्राण ज्योत मालवली. आज त्यांना साश्रू नयनांनी अखेरचा निरोप देण्यात आला.

 रक्षविसर्जन विधी उद्या गुरुवार दिनांक ७ डिसेंबर २३ रोजी सकाळी ९ वाजता वैकुंठ स्मशानभूमी रामवाडी येथे तर उत्तरकार्य विधी दिनांक ९ डिसेंबर २३ रोजी सकाळी ११ वाजता स्थळ – रामवाडी, तालुका जावळी जिल्हा सातारा येथे होणार आहे.

 

Team Star11Maharashtra

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!