महाराष्ट्र भूषण डॉ नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने स्वच्छता अभियान उपक्रम

स्टार११ न्युज राजेश सोंङकर——-
महाबळेश्वर.दि. ०३ केंद्रशासन व राज्यशासन यांनी डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानला स्वच्छता अभियान उपक्रम सर्वत्र राबविण्या च्या अनुषंगाने केलेल्या आव्हानाला प्रतिसाद देत समाज प्रबोधनासह समाजसेवेचे अखंड समाजहितोपयोगी उपक्रम राबविणाऱ्या रेवदंडा ता.अलिबाग जि. रायगड येथील डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानमार्फत महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून महात्मा गांधीजींना स्वच्छ भारताची स्वच्छांजली वाहण्यासाठी स्वच्छतादूत पद्मश्री महाराष्ट्र भूषण डॉ. श्री. अप्पासाहेब तथा दत्तात्रेय नारायण धर्माधिकारी, डॉ. श्री. सचिन दादा धर्माधिकारी, श्री उमेश दादा धर्माधिकारी श्री राहुल दादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी महाबळेश्वर येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी माखरिया गार्डन ते वेण्णा लेक रस्त्याची दुतर्फा स्वच्छता श्री समर्थ बैठकीतील ४८ सदस्यांकडून करण्यात आली. अंदाजे ३०० किलो इतका कचरा गोळा करण्यात आला. स्वच्छता अभियान प्रसंगी नफा मुख्य लिपिक श्री.आबा ढोबळे, स्वच्छता निरीक्षक श्री. बबन जाधव, हिलदारी असिस्टंट मॅनेजर डॉ मुकेश कुळकर्णी, नगरपालिका कर्मचारी वर्ग, हिलदार टीम, शहरातील नागरिकांनी सहभाग घेतला.
समाजाप्रति असलेले ऋण याची जाणीव होण्यासाठी डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान नेहमीच समाज उपयोगी सामाजिक बांधिलकी जपणारे उपक्रम राबवीत असते. आपले शारीरिक स्वास्थ्य व्यवस्थित राहण्यासाठी स्वच्छता खूप महत्त्वाची असते. याची जाणीव स्वच्छता अभियान केल्यानंतर सर्वांना होते. तसेच सामाजिक स्वच्छते सोबतच वैयक्तिक स्वच्छतेचे देखील महत्त्व सर्वांना समजते. प्रतिष्ठानच्या या उपक्रमाचे सर्व स्तरावरून कौतुक केले जात आहे.
ज्येष्ठ निरुपणकार महाराष्ट्र भूषण डॉ नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने अध्यात्मिक व सामाजिक कार्याच्या समन्वयातून अंधश्रद्धा निर्मूलनासाठी प्रबोधनात्मक कार्यक्रम, रक्तदान, आरोग्य शिबिरे, मूकबधिर विद्यार्थ्यांना श्रवण यंत्र वाटप, बस थांबा, बंधारा निर्मिती, जलपुनर्भरण, विहिरीतील गाळ काढणे, वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन, स्वच्छता अभियान, निर्मल्या पासून खतनिर्मिती, ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थीवर्गासाठी वय व अधिवास दाखला इत्यादी विविध उपक्रमातून माणसाला माणसाशी, अध्यात्माशी व समाजसेवेशी जोडण्याचे अभूतपूर्व काम डॉ नानासाहेब धर्माधिकारी सनमार्फत आजपर्यंत यशस्वीपणे राबविले आहेत.