
मेढा.दि.२१. मोघल जरी स्वराज्याचा घास गिळायला आला तरी पुरंदराने मोघलांना अद्दल घडवावी छत्रपतीच्या या आदेशाचे पालन करून पुरंदरचा संग्राम गाजवणारे नरवीर मुरारबाजी देशपांडे यांची गौरवगाथा सांगणारे शिवपुष्प स्वप्निल जयवंत धनावडे लिखित स्वराज्यनायक मुरारबाजी देशपांडे ह्या शिवपुष्पा चे प्रकाशन नरवीर मुरारबाजी देशपांडे यांचे वंशज आ. संदीप पोतनीस आणि आ. चैतालीताई पोतनीस ,अमितदादा कदम यांचे हस्ते जावळीच्या राजधानी शेजारी करंजे गावी श्री. भैरवनाथ मंदिर सभागृह मध्ये संपन्न झाला.
हिंदवी स्वराज्याचे यज्ञकुंड यात आपले पूर्वज यांनी प्राणांची आहुती देऊन स्वराज्य अबाधित ठेवले आहे. आज याच स्वराज्याचे पाईक म्हणून आपण शिवाजी महाराजांचे विचार आणि मर्द मावळ्यांचा स्वराज्य प्रेमी बाणा अणि निष्ठा अंगीकारणे गरजेचे आहे. दहाड जावलीची ह्या इतिहासिक पुस्तक नंतर स्वप्निल धनावडे यांनी स्वराज्य नायक मुरारबाजी देशपांडे यांवर विस्तृत असे पुस्तक लिहिले. सातारा जावळी मधील निष्ठावंत मावळ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य कार्यात मोलाचे योगदान दिले आहे.
एकेकाळी चंद्रराव मोरे यांच्या नेतृत्वात असणारे मुरारबाजी देशपांडे स्वराज्यात आले. आलमगीर बादशहा औरंगझेब याची लाखाची फौज पण अवघ्या 1800 मावळ्यांनी पुरंदर युद्धात मोघलांना धूळ चारून सलोखा करण्यास भाग पाडले. सबंध स्वराज्य गिळायला निघालेल्या मोघलांना पुरंदर रणसंग्रामात पुरती अद्दल घडवली. नरवीर मुरारबाजी देशपांडे यांच्या शौर्याची गाथा स्वराज्य नायक मुरारबाजी देशपांडे मध्ये स्वप्निल धनावडे यांनी शब्दबध्द केली आहे. प्रा. प्रकाश जवळ यांनी सदर पुस्तकाची प्रस्तावना केली आहे.
या शिवपुष्प प्रकाशन सोहळा निमित मुरारबाजी देशपांडे यांचे वंशज आ. संदीप पोतनीस चैताली ताई पोतनीस,अमितदादा कदम, पांडुरंग धनावडे गुरूजी, सरपंच परिषद उपाध्यक्ष बजरंग चौधरी प्रकाश जवळ, संजय जूनघरे , प्रवीण धनावडे,नामदेव धनावडे, सरपंच स्वप्नाली धनावडे, भास्कर धनावडे,संगीता चिकने, ग्रामस्थ मंडळ करंजे आणि कार्यक्रमाचे आयोजक शिव क्रांती हिंदवी सेना महाराष्ट्र राज्य चे सर्व पदाधिकारी आणि सदस्य उपस्थीत होते.