राजकीयसातारा

माथाडी कामगारांच्या नावावर विरोधकांनी या कष्टकरी कामगारांना उध्वस्त करून स्वतः ची घरे भरण्याची कामे केली…आ.शिवेंद्रसिंहराजे भोसले

स्टार ११ महाराष्ट्र न्युज   ——–   

केळघर.दि.०५.   लोकसभेची ही निवडणूक गावपातळीवरील नसून देश पातळीवरील आहे. देशाचे भवितव्य सुरक्षित देण्यासाठीही निवडणूक आहे. गेल्या दहा वर्षात पंतप्रधान म्हणून काम करत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचा दबदबा निर्माण केला आहे. विरोधकांकडे पंतप्रधान पदासाठी कोणताही ठोस चेहरा नाही.देशाचा कारभार भ्रष्टाचार मुक्त व देशाला महासत्ता बनविण्यासाठी जावळी तालुक्यातील मतदारांनी कोणत्याही भावनिक आवाहनांना बळी न पडता खासदार म्हणून उदयनराजे यांना मताधिक्य देऊन दिल्लीत पाठवावे व नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी आपले योगदान द्यावे,असे आवाहन आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.

आज केळघर (नांदगणे) येथील स्वामी समर्थ मंगल कार्यालयात महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ आयोजित कोपरा सभेत ते बोलत होते.यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे,जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे, शिवसेना जिल्हा सहसंपर्क प्रमुख एकनाथ ओंबळे,जयदीप शिंदे, हणमंतराव पार्टे, नानासाहेब शिंदे ,तुकाराम धनावडे,मोहनराव कासुर्डे,हरिभाऊ  शेलार, रामभाऊ शेलार, अर्चना रांजणे, निर्मला कासुर्डे,कविता धनावडे,श्रीहरी गोळे,बबनराव बेलोशे, सचिन पार्टे,जगन्नाथ वाडकर, अंकुश बेलोशे,प्रवीण कांबळे, प्रशांत तरडे, अविनाश दुर्गावळे, सागर धनावडे, सुनील जांभळे,आदींची उपस्थिती होती.

                                                                                                                                                                                                                                                उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ आयोजीत कोपरा सभेत शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा सत्कार करताना ज्ञानदेव रांजणे. समवेत वसंतराव मानकुमरे,एकनाथ ओंबळे, जयदीप शिंदे आदी.

 

आमदार शिवेंद्रसिंहराजे म्हणाले ,मी केलेली शाश्वत विकासकामे जावळीच्या जनतेसमोर आहेत. कुठल्याही गावात विकासकामे केली नाहीत असे एकही गाव जावळी तालुक्यात शिल्लक नाही. निवडणुका आल्या की विरोधी उमेदवारांना जावळीची अस्मिता दिसत नाही का ,शशिकांत शिंदे जलसंपदा मंत्री असताना बोंडारवाडी धरणाचा एकही दगड हलला नाही. या धरणाचे काम उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून मी मार्गी लावणार आहे. माथाडी कामगारांच्या नावावर विरोधकांनी या कष्टकरी कामगारांना उध्वस्त करून स्वतः ची घरे भरण्याची कामे केली आहेत. गेल्या १५ वर्षांत मी आमदार म्हणून सर्वाधिक विकासकामे मार्गी लावली आहेत, विरोधकांनी आमदार म्हणून असताना केलेली कामे काय आहेत ते सांगावे.१५वर्षांत जावळी तालुक्यात डोंगरदर्यावर रस्त्यांचे प्रश्न मार्गी लावले आहेत.

मतदारसंघाचा चौफेर विकास मी केला असून या निवडणुकीत तालुक्यातील जनतेने भावनिक न होता विरोधकांच्या भूलथापांना बळी न पडता उदयनराजेंना बहुमताने विजयी करावे.इंडिया आघाडीकडे एकही आश्वासक चेहरा नाही. नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व जगाने मान्य केले आहे. पाकिस्तानला देशोधडीला लावण्याचे काम मोदींनी केले आहे. दहा वर्षात भ्रष्टाचार मुक्त कारभार मोदींनी केला आहे.केळघर परिसरातील शेतकऱ्यांचा सातबारा चा प्रश्न उदयनराजे यांच्याशी बोलून सोडवणार आहे. शेतकऱ्यांना पूर्ववत पीक कर्ज मिळण्यासाठी पाठपुरावा करणार आहे. मी भाजपचे काम प्रामाणिक पणे केले असून मी जावळी तालुक्यातून उदयनराजेंना मताधिक्य मिळवून देण्याचा शब्द उपमुख्यमंत्री फडणवीस यांना दिलेला आहे. तो पूर्ण करण्याची जबाबदारी जावळी तालुक्यातील मतदारांची आहे. वसंतराव मानकुमरे म्हणाले, उदयनराजे निवडून येणार असून जावळीच्या इतिहासात आतापर्यंत कुठल्याही आमदाराने विकासकामे केली नाहीत त्यापेक्षा अधिक विकासकामे आमदार म्हणून शिवेंद्रसिंहराजे यांनी केली आहेत त्यामुळे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना ताकद देण्यासाठी एकदिलाने काम करणार आहे.

ज्ञानदेव रांजणे म्हणाले, अतिवृष्टीमुळे नुकसानीत शेत जमिनी, वाहून गेलेल्या विहिरी ,पाणीपुरवठा योजना दुरूस्ती साठी आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी स्वखर्चाने मोठ्या प्रमाणावर निधी देऊन शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्याचे काम केले. ज्या ज्या वेळी तालुक्यावर कोणतेही संकट आले की सर्वप्रथम शिवेंद्रसिंहराजे मदतीला धावून येतात. विरोधकांकडून जावळीच्या स्वाभिमानाच्या केवळ गप्पा मारल्या जातात. बोंडारवाडी धरणासाठी विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसून आमदार भोसले यांनी आंदोलन केले होते. धरणाचा प्रश्न केवळ आमदार भोसले हेच करतील याबाबत जनतेच्या मनात विश्वास आहे. लोकसभेला शिवेंद्रसिंहराजे हेच उमेदवार आहेत असे समजून जावळी तालुक्यातील जनतेने भाजपला मतदान करावे.प्रारंभी आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्या प्रमुख उपस्थितीत केळघर बाजारपेठेतून पदयात्रा काढण्यात आली. या पडयात्रेला नागरिक,मतदारांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.

 

 

 

 

Team Star11Maharashtra

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!