
स्टार ११ महाराष्ट्र न्युज प्रतिनिधी —–
सातारा. दि.१८. स्वावलंबी भारत अभियान सातारा जिल्हा आणि रोटरी क्लब ऑफ सातारा कॅम्प यांच्यावतीने दिनांक 19 व 20 ऑगस्ट रोजी येथील पोलीस करमणूक केंद्रांमध्ये भव्य भरड धान्य खरेदी विक्री महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे .या उपक्रमाची माहिती अभियान समन्वयक श्रीराज दीक्षित आशिष शहाणे त्यांनी पत्रकार परिषदेत दिली.
जयदीप ठुसे,रामचंद्र भोसले,रोटरी क्लब ऑफ सातारा कॅम्पचे अध्यक्ष विजय बाचुळकर, सचिव स्वप्नील वराडकर, संदीप जाधव,रामचंद्र भोसले इत्यादी यावेळी उपस्थित होते.
दीक्षित पुढे म्हणाले भरडधान्य विक्री महोत्सवाच्या पाठीमागे या भरड धान्याची उपयुक्तता आणि उपयोगिता सर्व सामान्यांपर्यंत पोहोचवणे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर या धान्यांना व्यासपीठ आणि उत्पादन क्षेत्र मिळवून देणे हा याचा मूळ हेतू आहे . हा महोत्सव दिनांक 19 व 20 ऑगस्ट रोजी येथील पोलीस करमणूक केंद्रात सकाळी दहा ते रात्री आठ वाजेपर्यंत खुला राहणार आहे . हा भरड धान्य महोत्सव शेतकऱ्यांसाठी खुला असून या महोत्सवा चाळीस स्टॉल्सचा समावेश असणार आहे . या सहभागासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही स्वावलंबी अभियान भारत यांच्यावतीने समाजामध्ये उद्योजकतेचा ध्यास राष्ट्राचा विकास या हेतू अंतर्गत व्यापक जागरूकता निर्माण करून आर्थिक दृष्ट्या स्वावलंबन वाढवणे हा आहे म्हणूनच या उपक्रमाचे नाव स्वावलंबी भारत अभियान असे आहे .
करोनानंतर भारतातील बेरोजगारीचा दर 7 टक्क्या पेक्षाही वाढला आहे . जिल्हास्तरावरील योजनांचे विकेंद्रीकरण कौशल्य विकास समृद्धी उद्योजकता अवलंब इत्यादी माध्यमातून छोट्या छोट्या उत्पादकांना उत्पादन विक्रीसाठी मोठे व्यासपीठ मिळवून देणे असे महोत्सवांचे हेतू आहेत . पहिल्या टप्प्यांमध्ये हा महोत्सव सातारा तालुका अंर्तगत आयोजित आहे . या महोत्सवात भरड धान्याच्या रेसिपी गीता कुलकर्णी सादर करणार आहेत .