सातारासामाजिक

जावळीतील गणेश मंडळांस अंकुश बाबा कदम यांच्या भेटी

स्टार ११ महाराष्ट्र न्युज ——

मेढा .दि.१२.ऐतिहासिक जावळी तालुक्याला एक परंपरा असून आजही तालुक्यातील नागरिक हे विविध सण,समारंभ,उत्सव मोठ्या उत्साहात साजरे करताना दिसून येतात. गणेशोत्सव मोठ्या थाटात जावळीकर साजरा करतात, गणेशोत्सव थाटात साजरा करण्याची सांस्कृतिक परंपरा जावळीकर पिढ्यानपिढ्या सांभाळत आहेत.असे प्रतिपादन स्वराज्य पक्षाचे राज्य उपाध्यक्ष अंकुश बाबा कदम यांनी केले.

गणेशोत्सवाच्या निमित्ताने अंकुश बाबा कदम हे गणेश मंडळांना भेटी देणे त्याचबरोबर गणेश मंडळांच्या आरतीस हजेरी लावत आहेत.त्यानिमित्ताने ते हुमगाव येथे बोलत होते.यावेळी विठ्ठल पवार,सचिन करंजेकर,संजय सुर्वे,दुंदले,रितेश कदम,हरिष कदम, संपूर्ण जावळी तालुक्यातील गणेश मंडळांना त्यांनी भेटी देण्याचा दौरा आखला आहे. मंगळवारी कुडाळ विभागातील शिंदेवाडी पासून त्यांचा हा गणेश मंडळांना भेटी देण्याचा दौरा सुरू झाला तो अखेर कुडाळ परिसरासह सायगाव विभागातील आनेवाडी येथे समाप्त झाला. हूमगाव येथील गणेशोत्सव मंडळास भेटीदरम्यान अंकुश बाबा कदम बोलत होते.

यावेळी अंकुश बाबा कदम यांना युवकांचा मोठा प्रतिसाद लाभत असलेले चित्र पाहायला मिळाले.यावेळी शिंदेवाडी,काटवली,बेलोशी,रूईघर,महू,करहर,खर्शी-बारामुरे,आखाडे,हुमगाव,सह सायगाव,विभागातील मोरघर,सह जवळपास 35 गणेशमंडळाना भेटी दिल्या.

जावळी तालुक्यातील माता-भगिनींचे अश्रू पुसायला आलोय

जावळी तालुक्याच्या विकासाचे स्वप्न उराशी घेऊन यापुढे सातारा-जावली मध्ये कार्यरत राहणार असून धरण असतानाही शेतीला सिंचनाला पाणी नसल्याने अनेक युवक बेरोजगार होऊन मुंबईचा रस्ता धरत आहेत. त्यामुळे या युवकांच्या दृष्टीने एक व्हिजन घेऊन काम करणार असून तालुक्यातील माता-भगिनींचे अश्रू पुसायला आलो असल्याचे अंकुश बाबा कदम यांनी यावेळी स्पष्ट केले.

भेटी दरम्यान अंकुश कदम यांना युवकांचा मोठा प्रतिसाद

अंकुशबाबा कदम यांच्या गणेशमंडळांच्या भेटीस तालुक्यातील युवकांचा मोठा प्रतिसाद मिळत असलेला पह्यायला मिळाला. विनम्र स्वभाव,बोलण्यातील करारीपणा यामुळे युवक वर्ग अंकुश कदम यांच्याकडे आकर्षिलेला पहायला मिळाला.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!