Uncategorized

देशात हुकूमशाही आणून संविधान बदलण्याचा प्रयत्न केला जातोय जयंत पाटील

स्टार ११ महाराष्ट्र न्युज ——–


मेढा.दि.२४.  ही निवडणूक या देशातल्या लोकशाही संपवण्यासाठी संविधान बदलणाऱ्या स्वप्न पाहणाऱ्या लोकांना निवडून येऊन द्यायचं नाही बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलंय ते बदलण्यासाठी चारशे पार चारशे पंधरा झाले की संविधान बदलायला मोकळे झाले.छत्रपती शिवाजी महाराज कधीच दिल्लीच्या तख्ता समोर कधीही झुकले नाहीत.मात्र आताची परिस्थिती काय आहे,हे महाराष्ट्रातील जनतेला समजले आहे.नांदगणे येथील श्री.स्वामी समर्थ मंगल कार्यालयात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे सातारा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत जयंत पाटील बोलत होते.

केळघर येथील बाजारपेठेतून प्रचारार्थ बैलगाडीतून काढण्यात आलेल्या मिरवणुकीस उस्फुर्त प्रतिसाद


यावेळी शशिकांत शिंदे, श्रीनिवास पाटील,सदाशिव सपकाळ, डॉ.भारत पाटणकर, बापूराव पार्टे,मोहनराव शिंदे, दीपक पवार,सारंग पाटील, राजेंद्र धनावडे,आतिश कदम विश्वनाथ धनावडे, सचिन जवळ, रुपाली भिसे,सुरेश पार्टे, नारायण शिंगटे, शिवाजीराव देशमुख, विठ्ठल पवार, चंद्रकांत इनामदार आदींची उपस्थिती होती.

यावेळी जयंत पाटील म्हणाले,.एकनाथ शिंदे यांच सरकार महाराष्ट्रात आल चार वेळा माथाडी कायदा बंद करण्याचा घाट घातला चार वेळा लेखी ऑर्डर झाल्या रद्द करण्यासाठी माथाडी जनता पेटून उठली त्यामुळे लोकसभा निवडणुकीमुळे हे प्रकरण तूर्तास थांबले आहे. देशात हुकूमशाही आणून संविधान बदलण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू आहे विरोधकांचा आवाज दाबून विरोधकांना ईडी, सीबीआय च्या चौकशीच्या फेऱ्यात आणून हुकूमशाही करणाऱ्या भाजपचा या निवडणुकीत पराभव निश्चित असल्याचेही पाटील यांनी यावेळी सांगितले.


भाजपला दुसऱ्यांचे पक्ष फोडायला लागतो. शरद पवारांचा पक्ष फोडला, उद्धव ठाकरेंचा पक्ष फोडला .भाजप फोडाफोडीचे राजकारण करत आहे.भूमीपुत्राला ताकद देऊन खासदार म्हणून काम करण्याची संधी मला संधी द्यावी यावेळी शशिकांत शिंदे यांनी सांगितले.


यावेळी बापूराव पार्टे, सदाशिव सपकाळ, भारत पाटणकर,यांची भाषणे झाली.प्रारंभी जयंत पाटील व शशिकांत शिंदे यांनी बैलगाडीतून मिरवणूक काढून मतदारांशी संवाद साधला.अनिल रूपनवर यांनी सूत्रसंचालन केले.सुरेश पार्टे यांनी आभार मानले.


 

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!