राज्यात अधिकाधिक दारू दुकानांना परवानगी देवून महाराष्ट्राचे मद्यराष्ट्र केले… विलासबाबा जवळ
स्टार ११ महाराष्ट्र
उत्पादन शुल्क मंत्र्याच्या दारू धोरणावर सडकून टिका.
मेढा.दि.२६. राज्याचे आर्थिक धोरण जर नशिले पदार्थाच्या करावर आधारित असतील तर ते राज्य कदाचित श्रीमंत होईल सुखी नाही.राज्यात दारुचा खप वाढवून तिजोरीत जादाचे पैसे जमा होतील .युवकांना रोजगारा ऐवजी दारुच्या नशेत ढकलून कुठल्यातरी गुन्ह्यात अडकला की नाँनक्रिमीलेअर मध्ये अडकून रोजगार मागण्यास अपात्र करुन सोडायचे. अशा शब्दात महाराष्ट्र राज्य व्यसनमुक्त युवक संघाचे राज्य प्रवक्ते विलासबाबा जवळ यांनी उपमुख्यमंत्री व उत्पादन शुल्कमंत्री अजीतदादा पवार यांच्या मद्यधोरणावर सडकून टिका प्रसिध्दिपत्रकाद्वारे केली आहे.
राज्यामध्ये दारुची दुकानदारी नेत्यांच्या बगलबच्च्यांचीच आहेत.राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी देशात नशाबंदी आवश्यक असल्याचे म्हंटले होते परंतू स्वातंत्र्यउत्तर काळात त्यांच्या विचारांना तिलांजली देवून अधिका अधिक दारू दुकानांना सरकारने परवानगी देवून आधीच महाराष्ट्राचे मद्यराष्ट्र केले आहे.या आधीच्या सरकारमधील उत्पादन शुल्क मंत्री महोदयांनी तर कहरच केला आहे. ग्रामपंचायतीच्या ना हरकत दाखल्या शिवाय शेकडो दारूदुकानांची खैरात वाटली आहे.या दुकानांना दिले गेलेले परवाने रद्द करण्यासाठी अनेक गावात आंदोलने सुरू आहेत. त्यातच भर म्हणून आता नविन उत्यादन शुल्क मंत्री मा.अजीतदादा पवार यांनी मद्याची दुकाने वाढविण्यासाठी दिलेला आदेश म्हणजे संत महंताची ही महाराष्ट्र भूमी मद्यासुरांची करायची आहे का? असा सवाल ही उपस्थित होत आहे.
खरंतर शाळा- महाविद्यालयांच्या स्तरावर व्यसनांचे दुष्परिणाम विद्यार्थ्यांना प्रबोधन करून त्यांच्या मनावर बिंबवायला हवेत असे न होता दारूला प्रतिष्ठा देण्याचे काम सरकार व त्यांचे मंत्री करीत असतील तर हे दुर्देवी आहे. दारूच्या अती सेवनामुळे रस्त्यांवर अनेक अपघात होवून निष्पाप लोकांचे जीव जातात,अनेक महिलांच्या हत्या-आत्महत्या होतात त्यांच्या मृत्युची जबाबदारी सरकार घेणार आहे का? व्यसनमुक्त युवक संघाच्या माध्यमातून गुरूवर्य बंडातात्या कराडकर यांचे सोबत लवकरच त्यांची भेट घेवून विस्तृत स्वरूपात यावर चर्चा करू असेही यावेळी विलासबाबा जवळ यांनी सांगीतले.